Sunday 20 August 2017

कठीण समयी फिरवा ‘११२’

तत्काळ मदतीसाठी राज्यात नवी योजना राबविणार; महासंचालकांची माहिती

अडचणीच्या वेळी नागरिकांना घटनास्थळी तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्यात लवकरच ‘वन वन टू’ योजना राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत मुख्य नियंत्रण कक्षाच्या ताफ्यात अधिकाधिक वाहने जोडण्यात येतील. जेणेकरून ११२ क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधला असता ती वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन मदत करतील. अडचणीत सापडलेल्यांना किमान वेळेत मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी दिली.

No comments:

Post a Comment