Monday 29 October 2018

शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादीच जबाबदार

शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. यावर उपाययोजना म्हणून भाजपने आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी आरक्षणासाठी यशस्वी पाठपुरावा करून मंजुरी मिळविली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला.

No comments:

Post a Comment