Wednesday 10 October 2018

पोटहिश्‍श्‍याचे वाद मिटणार

पुणे - ग्रामीणसह शहरी भागात जमिनीच्या पोटहिश्‍श्‍यावरून वर्षानुवर्षे वाद होतात. मात्र आता ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. जमिनीचे पोटहिस्से करण्यासाठी आता सर्व सदस्यांच्या सहमतीची, अथवा न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. एखाद्या सदस्याची हरकत असेल, अथवा मोजणीच्या वेळेस तो गैरहजर राहात असेल, तर त्याला नोटीस काढावी. सुनावणीनंतर ती निकाली काढून जमिनीचे पोटहिस्से करावेत, असा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यामुळे अभिलेखातील दुरुस्तीसही मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment