‘नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे’, असा एक सुविचार पोलिस आयुक्तालयात नुकताच वाचनात आला. मात्र प्रत्यक्षात काही पोलिस ठाण्यात आणि चौकीत जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाईट अनुभव येत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढतच आहेत. ‘स्मार्ट पोलिसिंग’चा नारा देताना पोलिसांनीही आता नागरिकांसोबत अरे-तुरेची भाषा, दमदाटी आणि हेकेखोरपणा सोडून देण्याची गरज आहे.

No comments:
Post a Comment