पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून, दागिने मोडून सदनिका घेतल्या. हक्काचे घर म्हणून मिळाले या आनंदात राहायला आले. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागामालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती चिखली-मोशी परिसरातील बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील आहे.

No comments:
Post a Comment