Monday, 26 August 2013

प्रशिक्षित शहर नियोजकांची फळी निर्माण करायला हवी

पिंपरी : जमिनी आणि सदनिकांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे केली जातात. परंतु कालांतराने ही बांधकामे निष्कासित करावी लागतात. त्यातून रहिवाशांचे नुकसान होते. कायदा आणि सुव्यवस्थेपुढेही आव्हान उभे राहाते, असे प्रश्न उदभवूच नयेत यासाठी प्रशिक्षित शहर नियोजकांची (टाऊन प्लॅनर्स) फळी निर्माण करावी लागेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आकुर्डी स्टेशन येथे व्यक्त केले. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. 

अभय योजनेला हवे परिपत्रकाचे अभय

पिंपरी- महापालिकेने गाजावाजा करून अभय योजनेला मुदतवाढ दिली मात्र याबाबतचे परिपत्रक अद्याप काढण्यात आले नाही.

उद्या सायंकाळी शहरात पाणी नाही

पिंपरी- थेरगावातील जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने मंगळवारी (ता.

सिंधी बांधवांच्या चालिया ...

पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी समाज बांधवांचा 'चालिया' निमित्ताने मोठ्या भक्तीभावाने रथयात्रा काढली. 16 जुलै पासून सुरु असलेल्या उपवासाची आज (24 ऑगस्ट) रोजी सांगता करत मोठ्या उत्साहात सिंधी समाजाचे दैवत झुलेलाल यांची शोभायात्रा (जुलूस) काढण्यात आली होती. जय झुलेलाल...जय झुलेलाल....च्या जयघोषात भाविक रंगून गेले होते.

महापालिका आता बीआरटीएस व पादचारी ...

सल्लागाराच्या नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे 
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटीएस व पादचारी मार्गासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी बृहत आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 30 लाख रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.

चला..विवेकाची गुढी उभारू

अंनिसची सभा : अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा निर्धार

पिंपरी : अंधश्रद्धांना मूठमाती देऊन विज्ञान आणि विवेकाची गुढी उभारू असा संकल्प करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहरातील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे विवेकी समाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करूयात तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना शनिवारी आकुर्डीतील काळभोरनगर येथे व्यक्त करण्यात आल्या. 

हिंजवडीतील महिलेची दहा कोटींची फसवणूक

पिंपरी -&nbsp मल्टिप्लेक्‍स व मॉल बांधण्याचे आमिष दाखवून महिलेच्या मालकीच्या जागेवर तीन विविध बॅंकांमधून कर्ज काढून सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत उघडकीस आला.