Thursday, 29 March 2018

निगडीत मेट्रोचे मल्टिमोडल हब - डॉ. ब्रिजेश दीक्षित

पिंपरी - ‘निगडीपर्यंत मेट्रो नेल्यास तिथे मल्टिमोडल हब होईल,’’ असा विश्‍वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्प पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्याचा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा मोठा दबाव आहे. त्यासाठी निगडीपर्यंतचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur-Maha-Metro

निधी कमी मिळाला तरी ‘मेट्रो’चे काम वेगातच

महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सन 20018-2019 आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 हजार 600 कोटी रुपये निधीची मागणी राज्य व केंद्राकडे केली होती. त्यातील 850 पैकी केवळ 310 कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. टप्पाटप्याने हा निधी मिळेल, त्यामुळे कामांचा वेग कायम राहणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

मेट्रोच्या माहिती केंद्रासाठी संभाजी उद्यानात जागा

ल्या वर्षभरापासून या माहिती केंद्रासाठी महामेट्रोकडून जागेची शोधाशोध सुरू होती.

PCMC begins construction of two roads to airport

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started construction work of two roads in Charholi to ensure better and quick connectivity to the Lohegaon airport.

स्वच्छतागृहाच्या जागेची विक्री?

पिंपरी - साई चौकातील स्वच्छतागृह महापालिका प्रभागाने ठराव करून पाडले. तेथे वाचनालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, स्वच्छतागृहाची जागा व्यापाऱ्याला कोटींच्या भावात विकण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अयप्पा मंदिरामागील स्वच्छतागृह नुकतेच पाडले होते. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अग्निशामक विभागाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी - प्रस्तावित अग्निशामक केंद्र उभारणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. मानधनावरील वाहनचालक नियुक्‍तीला खो बसला आहे. स्थायी समितीला केवळ खरेदीमध्ये रस आहे. असे प्रकार म्हणजे महापालिकेचे शहरातील नागरिकांच्या जिवाशी केलेला खेळच आहे.

लांडगे तलाव समस्यांच्या गर्तेत

भोसरी - येथील बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्राला चोरीस गेलेले शॉवर, तुटलेल्या फरशा, प्रथमोपचार पेटीचा अभाव, लाइफ गार्डची कमतरता, नादुरुस्त पंप, खांबावरील गायब दिवे आदी समस्यांनी ग्रासले आहे. तुटलेल्या फरशा आणि जाळ्यांचा पोहण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.