पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव विमानतळ अवघे सहा किलोमीटर अंतर. मात्र, रस्त्याअभावी दिघी- विश्रांतवाडी मार्गे तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अतिरहदारीमुळे एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. आता हे अंतर अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे. कारण, चऱ्होलीगाव ते लोहगाव रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

No comments:
Post a Comment