पुणे : सुरत-अहमदाबाद मॉडेलच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आठपदरी रिंगरोड होणार आहे. तब्बल 129 किलोमीटरचा हा रिंगरोड 58 गावांमधून जाणार असून 'नगररचना योजना'(टीपी स्कीम) द्वारे होणार आहे. त्यासाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना 50 टक्के भूखंड परतावा देण्यात येणार असल्याने हा रिंगरोड पूर्णतः 'टोल फ्री' असेल, अशी माहिती 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी शनिवारी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

No comments:
Post a Comment