पिंपरी - तीन वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने गुंतविलेली तब्बल दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक "संस्कार ग्रुप'मुळे अडचणीत आली आहे. पैसे परत देण्याच्या बोलीवर दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. शेकडो माजी सैनिक, तीनशेवर महिला बचत गट, असंख्य ज्येष्ठ नागरिक मिळून सुमारे 50 हजार ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

No comments:
Post a Comment