पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही. राज्याच्या वॉररूम मधील प्रमुख प्रकल्प असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या पोलिस खात्याकडूनच रिंगरोडच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments:
Post a Comment