आळंदी : गेली आठवडाभरापासून पोकलेनच्या साहाय्याने इंद्रायणी नदीपात्रात आळंदी पालिका हद्दीतील स्मशानभूमी लगतचा कचरा थेट नदीपात्रात लोटून देण्याचे पाप सध्या पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासन आणि पदाधिकारी आपल्याला याबाबत माहित नसल्याचे सांगतात. पिंपरी महापालिकेकडून होणाऱ्या नदीप्रदुषणाबाबत नेहमीच ओरडणारी पालिका मात्र स्वताही याबाबत डोळझाक करत असल्याचे चित्र सध्या आळंदीत पाहायला मिळत आहे.

No comments:
Post a Comment