नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू विरूद्ध युद्धात केंद्र सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाउन लागू केले आहे. या दरम्यान गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या मदत पॅकेजचा एक भाग म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार मोफत एलपीजी सिलेंडर पुरवेल. सरकारच्या या योजनेचा लाभ केवळ या योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लोकांनाच मिळणार आहे.


No comments:
Post a Comment