Thursday, 12 April 2018

Why crime in PCMC just took a major hit

Citizens, activists, civil society and elected representatives had been demanding an independent commissionerate for Pimpri-Chinchwad since a long time citing rapid urbanisation, rising crime rate, inadequate police patrolling on the streets, and deteriorating law and order situation in the area as the reasons behind the demand

Citizens, activists, civil society and elected representatives had been demanding an independent commissionerate for Pimpri-Chinchwad since a long time citing rapid urbanisation, rising crime rate, inadequate police patrolling on the streets, and deteriorating law and order situation in the area as the reasons behind the demand. 

PCMC to charge parking fee on key roads soon

PIMPRI CHINCHWAD: Very soon, owners of two-wheelers will have to pay Rs2, while owners of four-wheelers will have to pay Rs10 as charges to park their vehicles by the road in Pimpri Chindhwad, where the parking policy applies.

प्लॅस्टिक ड्रमने रोखली जलपर्णी

आळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयोग; पिंपरीच्या सांडपाण्यामुळे समस्या
आळंदी (पुणे): पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात गेले काही महिने जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यातून पाणी उपसणेही कठीण झाले होते. त्यावर नगरपालिकेने कमी खर्चाचा उपाय शोधला असून प्लॅस्टिकचे 135 ड्रम वायरच्या साहाय्याने एकमेकांना बांधून ते पाण्यात सोडले आहेत, त्यामुळे जलपर्णी आटोक्‍यात आणली आहे. त्यासाठी पालिकेला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

पिंपरी शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण?

पिंपरी - महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार आहे. यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप पोलिस आयुक्‍तालयाची जागाच निश्‍चित झालेली नाही. यामुळे आयुक्‍तालयाच्या जागेबरोबर शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण असणार, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

"पीएफ' न भरणाऱ्या शहरात 622 कंपन्या

पिंपरी  - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये लहान मोठ्या सर्व कंपन्यांनी स्वतःचा हिस्सा भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेक कंपन्या ही रक्‍कम भरतच नाहीत. पिंपरी-चिंचवड परिसरातील अशा 622 कंपन्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाने शोधून काढल्या आहेत. या कंपन्यांची 800 बॅंक खाती सील करून त्यामधून एक कोटी 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी "सकाळ'ला दिली. गेल्या आर्थिक वर्षात ही कारवाई करण्यात आली आहे. 

कुदळवाडीत भंगाराची सात गोदामे खाक

चिखली - कुदळवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत भंगार मालाची सात गोदामे जळून खाक झाली. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी होती. या कंपनीच्या मागच्या भागालाही आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून प्रथम कंपनीला लागलेली आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच बंब व स्थानिक नागरिकांचे पाण्याचे दहा टॅंकरच्या साह्याने भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग बुधवारी पहाटे आटोक्‍यात आणली. 

पिंपरी काळेवाडीतील भुमिपुत्रांनी तांबडया मातीचा वारसा जपला

पंचनाथ उत्सवातील कुस्तीच्या आखाडयात शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले
चौफेर न्यूज – महाराष्ट्र आजही आपल्या पराक्रमांची आणि संस्कृतीची गाथा सांगतो ती तांबड्या मातीतील कुस्तीमुळे. साडेतीनशे वर्षांपुर्वी शिवछत्रपतींच्या हाकेला ओ देताना हजारो पैलवान बाहेर पडले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. भगव्या झेंड्याचा धाक काश्मिर ते कन्याकुमारी, काबुल ते कंधारपर्यत बसवला. राजघराण्यातील मंडळीही कुस्त्या खेळत असत. छत्रपतीचे धाकटे बंधू चिमासाहेब महाराजही निष्णात कुस्तीगीर होते. तांबडया मातीतील कुस्तीला देशभर राजाश्रय मिळत होता. पवित्र इंद्रायणी आणि पवनेच्या कुशीत वसलेल्या परिसरात स्वातंत्र्य पुर्व काळात खडकी व देहूरोड येथे दारुगोळ्याचा कारखाना सुरु झाला. स्वातंत्र्यानंतर 1952 साली पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पिंपरी मध्ये एचए कंपनीचे भूमीपुजन केले. यानंतर या पंचक्रोशीची औद्योगिकीकरणाकडे वाटचाल सुरु झाली. उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि खासदार आण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड शहरात एमआयडीसीचा विस्तार झाला. देशभरातून रोजीरोटीसाठी आलेल्या कष्टक-यांमुळे पिंपरी चिंचवड नगरीने आंतरराष्ट्रीय पातळीने अनेक क्षेत्रात नाव कमविले. पाच गावांचे शहर ते मेट्रोसिटी आणि स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु असणा-या पिंपरी काळेवाडीतील भूमिपुत्रांनी 21 व्या शतकातही तांबडया मातीचा वारसा जपत भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले.