पुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध प्रकारच्या तक्रारी ‘विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार आहेत. तक्रार केल्यावर स्वतःची बाजू नागरिक स्वतः मांडू शकतात. त्यासाठी वकीलही नियुक्त करण्याची गरज नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे.

No comments:
Post a Comment