केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंट बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यास, पुण्यातील तीन कॅन्टोन्मेंटचा कारभार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे जाईल. असे झाल्यास याठिकाणी महापालिकेचा कायदा लागू होऊन, नागरिकांना सुविधा मिळतील. मात्र बांधकामाबाबचे कॅन्टोन्मेंटचे कडक नियम हटल्याने सिमेंटचे जंगल विस्तारेल. असे झाल्यास हा परिसर बकाल होण्याचा धोका आहे. तसेच या मोकळ्या जागांच्या आसपास लष्कराची महत्त्वाची कार्यालये आहेत, त्यांनासुध्दा धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment