पिंपरी - समान पाणीवाटपातील महापालिकेचे कुचकामी धोरण आणि त्यातून निर्माण झालेल्या ‘टॅंकरराज’च्या विरोधात शहरातील सोसायटीधारकांनी आता दंड थोपटले आहेत. महापालिका आणि टॅंकरमाफियांना आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. पाण्याचे समान वाटप करण्यात महापालिका ‘सपशेल’ अपयशी ठरल्याचा आरोप करत जोपर्यंत पाण्याचे पूर्वनियोजन होत नाही, तोपर्यंत बालेवाडी-बाणेरच्या धर्तीवर शहरातील बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment