दापोडीजवळ नदीपात्रालगत भराव टाकून अनधिकृत घरे उभारली जात आहेत. प्रथम नदीपात्रालगत राडारोडा टाकायचा. त्यानंतर त्याचे सपाटीकरण करून त्याठिकाणी पत्र्यांची घरे ठोकायची आणि काही महिन्यानंतर पक्की घरे बांधायची. असा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. काही ठिकाणी नाल्याकडेनेही घरे उभारली जात आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

No comments:
Post a Comment