पिंपळे-सौदागर – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या बीआरटीएस मार्गांपैकी बहुतेक मार्ग धूळखात आहेत. पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते कासारवाडी बीआरटी रस्ता दोनच वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्चून बनवण्यात आला. परंतु या ठिकाणी या रस्त्याला गोडाऊनचे स्वरुप आले आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आला असून याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील समितीने केली आहे.

No comments:
Post a Comment