राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आलेख उंचावत आहे. त्यातच अरंद रस्ते, वाढणारी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. वाहनांच्या गर्दीतून कमी वेळात इच्छित स्थळी जाण्यासाठी बहुतांश चालकांकडून वाहतुकीच्या नियमांना बगल दिली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत बेशिस्त वाहतुकीद्वारे वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणार्या तब्बल 15 लाख 65 हजार चालकांचे चलन फाडून कारवाई केली आहे.

No comments:
Post a Comment